Crop Insurance: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतपिकाची नुकसान झाल्यानंतर पिक विमा देण्यात येतो. परंतु खरीप हंगाम 2024 साठी पिक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. जून महिना आता संपत आलेला असताना देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप पिक विमा रक्कम जमा झाली नाही आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. (Crop Insurance)
विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या उत्तरांचा गोंधळ झालेला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये ज्या ठिकाणी उत्पादन क्षमतेवर आधारित अथवा कापणीनंतर पिक विमा मंजूर झाले आहेत. त्या शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांशी संपर्क साधल्यास त्यांना सर्वांना एका सारखेच उत्तर मिळत आहे. (Crop Insurance) की राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळाली तर पिक विमा वितरण होईल. त्यामुळे शेतकरी हे उत्तर ऐकून नैराश्याचा सामना करत आहे. शेतकऱ्यांना पिक विमा नेमका कधी मिळेल याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.
काही शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला नाही तर काही ठिकाणी दुसरा टप्पा देण्याची चर्चा चालू होत आहे. तर काही विभागात तिसऱ्या टप्प्याची देखील चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. (Crop Insurance) सरकार निधी वितरणाची जटील व्यवस्था कधीपर्यंत सुरू राहील त्यासाठी आवश्यक असणारा आर्थिक आधार आणि संबंधित बाबींची स्पष्ट माहिती दिली जात नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना अपूर्ण माहिती मिळत आहे. ज्यामुळे गैरसमज देखील वाढत आहेत, व राजकीय पक्षांकडूनही या विषयावर वेगवेगळी भूमिका मांडली जात आहे.Crop Insurance
हा निधी कार्यान्वयेच्या खर्चासाठी आणि मागील वर्षी वितरण झालेल्या निधीच्या आधारावरती दिला जाणार आहे. खरीप हंगाम 2024 साठी 1255 कोटी रुपयांचे समायोजन करून उर्वरित रक्कम प्रथम टप्प्यात वितरित करण्यात देखील आलेले आहेत. पिक विमा निधी वितरणाची पद्धत ही तीन टप्प्यांमध्ये होत आहे. (Crop Insurance) प्रथम टप्प्यांमध्ये 40 टक्के प्रारंभिक रक्कम दिले जाते तसेच द्वितीय टप्प्यामध्ये विमा कंपन्यांना त्यांच्या वितरणाच्या आवश्यकतेनुसार निधी दिला जातो. यातून स्थानिक पातळीवरील दावे किंवा क्षमतेवर आधारित काढली जातात. तसेच तृतीय टप्प्यामध्ये 20 टक्के रक्कम दिली जाते ज्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि कंपन्यांना 60 ते 80% पर्यंत वितरण करावे लागते तेथे कंपनी टप्प्याकडे पाहतात.Crop Insurance